24 October, 2010

आक्रोश तोच....

आक्रोश नावाचा सिनेमा मी नुकताच पाहिला. कथेचा मध्यवर्ती विषय ऑनर किलिंग हा आहे. ग्रामीण भारतातल्या कोणत्याही गावा-तालुक्या-जिल्ह्यात घडणारी ही गोष्ट. राजधानी दिल्लीजवळचा हा प्रदेश. जातीचं जोखड मनावर घट्ट असलेली माणसं. बाहेरच्या मोकळ्या विचारांच्या वार्यांचा स्पर्शही न झालेली. दलित मुलावर प्रेम करणारी तथाकथित उच्च जातीच्या, गावाचा ’मालक’ असलेल्या दांडग्या बापाची मुलगी. प्रेमाच्या पूर्ततेसाठी बंड करण्याची हिंमत करण्याच्या आधीच तिला आणि तिच्या प्रियकराला आणि त्यांना मदत करणार्याब शहरातल्या त्याच्या मित्रांना गप्प बसवलं जातं. आणि पुढे या जुलुमी, अख्ख्या गावाला वेठीला धरणार्याप टोळीच्या विरोधातला कायदेशीर संघर्ष.....वगैरे. कथानक तसं जुनंच. बेनेगल – तेंडुलकर यांच्या अंकुर चित्रपटाची आठवण आक्रोश बघताना येते. आणि इतकी (किमान ३०) वर्षं उलटली तरीही जात हे प्रकरण आपल्या समाजातून पातळ व्हायला तयार नाही याचा भयंकर त्रास होतो.
अंकुरमध्ये अन्याय करणारे सरंजामशाहीतले पारंपरिक जमीनदार आहेत.
आक्रोशमध्ये गावाला दहशत बसवणारी टोळी आहे लोकशाही व्यवस्थेने नेमलेले कलेक्टर, एस पी असे सरकारी अधिकारी, गावातले सवर्ण आणि राजकारणी यांची. अंकुरच्या शेवटी अन्यायग्रस्त कुटुंबातला एक लहान मुलगा संतापाच्या भरात जमीनदाराच्या खिडकीवर एक दगड भिरकावतो आणि खिडकीच्या काचेला तडा जाऊन ती फुटते. आक्रोशमध्ये असाच एक मुलगा जुलुम करणार्‍याच्या मनगटाचा त्वेषाने चावा घेतो. आणि शेवटी एक दलित स्त्री या टोळीचा सूड घेते.
सिनेमा म्हणून आक्रोश खूपच लाउड वाटला. कथानक आणि गावातलं वास्तव तेच असलं तरी नव्या काळात झालेल्या काही बदलांची चाहूल आक्रोशमध्ये दिसली. त्या झांझर गावातला तो दलित तरुण दिल्लीच्या कॉलेजात डॉक्टर बनण्यासाठी आलाय. आणि त्याचे जवळचे मित्र आहेत दिल्लीतल्या उच्चभ्रू कुटुंबातून आलेले. दलित तरुणावर झालेल्या अत्याचाराविरुद्ध दाद मागणारे मेडिकल कॉलेजातले विद्यार्थी आहेत. आणि त्यांना साथ देणारा मिडियादेखील. गावातल्या प्रकरणाचा छडा लावायला आलेला अधिकारी आहे झांझरसारख्याच एका गावात दलित कुटुंबात जन्मलेला, मोठा संघर्ष करत अधिकारपदापर्यंत पोचलेला तरुण. अशी सर्व जाती-धर्मातली तरुण पिढी जातीपाती आणि अन्य अमानुष परंपरांना उलथवून टाकेलच.
अजय देवगण आणि अक्षय खन्ना सलमान-शहारुखहून किती निराळे आणि खरे आहेत हे जाणवतं. आक्रोश आणखी वास्तववादी करता आला असता असं म्हणताना जातीच्या, ऑनर किलिंगच्या वास्तवाचं दुःख होतं आणि शरमही वाटते.
Collapse





Medha Kulkarni

06 September, 2010

Speak up…Write out

Speak up…Write out….. by Medha Kulkarni (June 09)

Why can’t we take the value of brotherhood to the people just like we sell soap using advertising?

The basic point is turning people to your side, to make them a part of your agenda, to inspire them to fulfill their responsibilities, to guide them towards ‘action’ by making them hold the finger of ‘thought’, to convince them that you are doing their work and to include them in the task some way or the other. This is in fact a long winding road. Technology is an aid, a medium. The modern-times technology has made this long route to reach people short and easy. But have our social, political workers, leaders realised this?
Since 2006, a project on the issue of Mother n Newborn Health is being implemented in seven cities in Maharashtra. After reading words like ‘Mother-Newborn- Health’ and ‘project’, one might mistake this to be the same old routine, social (boring) ‘ngoetic’ stuff. But anything related to human being, anything related to its existence is never boring, can’t ever be! And where there is a mother, a child, there exists an entire human culture. Thus this is one subject that remains as fresh as ever.

Those working in Media can identify, reveal a human aspect in any issue. Well, aren’t otherwise believed to be mundane figures and statistics use to denote existence of mankind? A series of workshops which we (Sampark Network) organise for the volunteers participating in the above mentioned project are based on the same principle. If these volunteers aspire to expand the scope of their work, if they want to take their work to the people with the help of Media, if they wish people to contribute their fair share in solving social problems, then these volunteers must make the human angle in their work visible by thinking beyond the purview of their project. Supporting facts, figures, case studies and resolutions related to every topic are always readily available. Importance of information is paramount. But what is the use of mere information? One must be able to team up information with a human face. When this happens, effective Social Marketing is possible.

Yes, Social Marketing. A contemporary term which in the past was termed as ‘Enlightenment’. Today, it is also branded as Advocacy, Social Marketing. In the year 1952, J. D. Webb, a professional from the field of advertising in America presented a question - Why can’t we take the value of brotherhood to the people just like we sell soap using advertising? Webb conducted a comparative study of material marketing and social campaigns of that era and propounded that social campaigns which adopted the exact technique of material marketing were a complete success (Reference: Journal Of Marketing – Issue No. 35, 1971). In the US, marketing of the Presidential election is quite an old tradition. Recently, during the election campaign of Barak Obama, we witnessed an extensive and clever use of all information and audio technologies, right from radio to modern facilities like internet. Obama had even requested the citizens to suggest him points for his post-oath-taking-ceremony speech and American citizens participated enthusiastically, happily to prepare a format of their newly elected President’s maiden speech. A special blog created for this purpose was flooded with people’s opinions, desires and expectations. The basic point is turning people to your side, to make them a part of your agenda, to inspire them to fulfill their responsibilities, to guide them towards ‘action’ by making them hold the finger of ‘thought’, to convince them that you are doing their work and to include them in the task some way or the other. This is in fact a long winding road. Technology is an aid, a medium. The modern-times technology has made this long route to reach people short and easy. But have our social, political workers, leaders realised this? Here I would like to mention the observations during my stint at Aakashvani and while advocating social issues on behalf of Sampark.

Social activists always voice their grievance that the space social issues command in Media is getting sparse. Earlier the blame was put on newspapers which were looked upon as agents of the capitalists. Now things like globalisation, corporatisation of media are held responsible for the same. Some days back, during a training programme organised by us for its Zilla-level members, one national party observed that these members saw the world from a certain fixed angle. Because of this, limitations arise in understanding the changing world. It is important for the party workers to understand their party, its role and must have faith in it. But to extend the scope of their work and to help it reach people outside the party, they must assume that the people outside their party think differently than the party workers. You must have a main stream Media to reach them. Every social, political organisation has its own mouthpiece.
However, its readership is limited. If one has to increase the circulation of these mouthpieces, then it must include content that will appeal to those who believe in an ideology different than yours. We then took up the task of reading and analysing content of several main stream newspapers. By the way, today this activity is an inseparable aspect of Sampark’s Media Training programme. After we finish reading and analysing any newspaper, the common reaction of the workers at all times we get that they had never read the newspapers in such a manner, with such an ‘open’ mind. Mainstream Media is all-inclusive by nature. There is a scope for everyone to play a role in it. And like I said in the beginning, whatever is related to human being, whatever is related to its existence can never be boring. What we learn here is that we must have the skill to use the position we get to its fullest. While producing programmes on the social issues on Akashwani, one hurdle I faced was that a person having a grip over a particular topic couldn’t present his thoughts in a way compatible to the medium of radio.

If the interview is slotted for 10 minutes, then the interviewee use to think that his topic was so vast, so important, and with so much to tell how can he finish it all in just 10 minutes? Now TV channels have shrunk the same time to mere seconds. Since all social, political activists have this habit of speaking lengthy for hours in meetings and public gatherings, they find it difficult to keep their talk short and to the point. Basically, studying how to speak and write, practicing it, experimenting in it and attempting to influence using it, is not given much of an importance in social and political arena. The general assumption is that people take it casually & are sick of doing study. But now due to the growing power of Media and call for turning the young generation towards oneself, time has come for the workers & leaders to pay attention to the detail while communicating, speaking and writing everything, everything right from formatting an SMS to preparing a format of a speech.

The point is, it is important to keep talking and writing in Media for social & political workers. Mainstream Media has interests of its own. In such times, one can surely reach people through a regulation-free e-medium. Again, the language of e-Media is different. If one wants to reach the young generation, then e-Media is more important. We began the training programme for the young volunteers of the earlier mentioned ‘Mother n Newborn health’ project which is being implemented in seven cities in Maharashtra with newspaper reading and news writing. Now they have reached a level where they recently organised an advocacy campaign called ‘Jananni Surakshaa Jagruti Abhiyaan’. This is replicable. To influence government’s policies, to make work the implementing machinery, role of Media is vital. Also, such social marketing definitely has enough power to influence political processes.

(from www.netsampark.org)


येथे चौकशी करावी

- ३१ ऒक्टोबर - मेधा कुळकर्णी

आजोबांना त्यांचा जुना रेडिओ दुरुस्त करून हवा होता. नेहमीच्या रिपेअरवाल्याने ते जमणार नाही म्हणून सांगितलं. नातीने पटकन "जस्ट डायल"ला फ़ोन लावला आणि परिसरातल्या पाच-सहा रेडिओ दुरुस्तीवाल्यांचे नंबर मिळवले. आजोबांचं काम एका कॊलमध्ये होऊन गेलं. उपकरणांच्या दुरुस्त्या करणारे, घराला लागणार्‍या सेवा पुरवणारे, खरेदीसाठी योग्य दुकान, खादाडीसाठी हॊटेल्स, तयार वस्तू पुरवणारे वगैरे वगैरे वगैरे ...."जस्ट डायल" चा फ़ोन फ़िरवला की हवी ती माहिती तुमच्या मोबाइलमध्ये एस एम एसच्या किंवा संगणकात इ मेलच्या रूपात हजर. फ़ोन नंबर, पत्ते लिहून घेण्याचाही त्रास नको. अलिकडे तर "जस्ट डायल"वाले आपल्याला हव्या असणार्‍या सेवेला आपला फ़ोन थेट जोडूनच देतात. म्हणजे पुन्हा दुसर्‍यांदा फ़ोन करण्याचा व्यापही नको. खरोखरच एका कॊलमध्ये काम.

"जस्ट डायल"मधून उपकरण दुरुस्ती किंवा दुकान किंवा हॊटेल, थिएटर यांची माहिती मिळणं ठीक. लाडू, चकल्या, चिवडा हे पदार्थ मिळणंही ठीकच. पण हॊस्टेलवर राहणारी भाची सांगत होती की गणेश चतुर्थीच्या दिवशी तिच्या मैत्रिणींना उकडीचे मोदक खायची इच्छा झाली. पण त्या इच्छापूर्तीसाठी अभ्यास सोडून, ट्रेन-बस-रिक्षा असा प्रवास करत कुणा नातेवाइकाच्या किंवा अगदी स्वतःच्यासुद्धा घरी जाणं परवडण्यासारखं नव्हतं. हॊस्टेलच्या परिसरात उकडीचे मोदक करून देणारं कोणी भेटलं नाही. मग माहिती काढण्याचा हमखास मार्ग म्हणजे "जस्ट डायल". पण उकडीच्या मोदकांसारखा खास घरगुती पदार्थ करून देणार्‍याची, खर तर देणारीची माहिती तिथे मिळेल? भाचीने चौकशी केली आणि चक्क केतकर नावाच्या उकडीचे मोदक करून देणार्‍या बाई सापडल्या. ऒर्डर दिली. संध्याकाळी हॊस्टेलवर छानपैकी उकडीच्या मोदकांची पार्टी झाली. यंदा दिवाळीच्या फ़राळाचे जिन्नस अनेक मैत्रिणींनी "जस्ट डायल"वरूनच बुक केल्याचं कळलं. यात विशेष काहीच वाटलं नाही.

हे सगळं सुरु कसं झालं? व्ही एस एस मणी हे "जस्ट डायल"चे जनक. टेलिफ़ोन डिरेक्टरीसाठी यलो पेजेस तयार करणार्‍या कंपनीत मणी नोकरी करत होते. तिथे एका गिर्‍हाइकाबरोबर झालेल्या चर्चेतून ग्राहकांनी डायल केल्याबरोबर त्यांना सेवा आणि वस्तू यांची माहिती चोविस तास पुरवणार्‍या सर्च इंजिनची कल्पना त्यांना सुचली. आणि मणी कामाला लागले. "जस्ट डायल"ची सुरुवात १९९२च्या सुमारास झाली खरी. पण लगेचच ते बंद पडलं. माहितीतंत्रज्ञानाच्या प्रभावाचा काळ अजून यायचा होता. एका लॆंड फ़ोन कनेक्शनसाठी वर्षानुवर्ष तिष्ठत राहण्याचा तो काळ. मोबाइल यायचाच होता. त्यामुळे मणी यांची माहिती देणार्‍या या सर्च इंजिनची कल्पना लोकांच्या पचनी पडली नाही. पुढे १९९२ ते ९६ या काळात मणी यांनी या कल्पनेवर खूप काम केलं आणि १९९६ मध्ये आता आहे त्या स्वरुपातलं "जस्ट डायल" सुरू झालं. सुरू करण्यासाठी मणी यांनी वापरलेलं भांडवल होतं उधार उसनवार मिळवलेलं फ़र्निचर, भाड्याने आणलेले संगणक, भाड्यावरच घेतलेली एका गॆरेजमधली दहा बाय तीस ची जागा आणि पनास हजार रुपये...बस्स. ग्राहक आणि त्यांना सेवा देणारे यांचा मेळ घालून दोघांचाही; आणि स्वतःचा, म्हणजे "जस्ट डायल" चा फ़ायदा करून देणारं हे एक बिझिनेस मॊडेल बनलं. आपल्या सेवेतून माहिती मिळवणार्‍या एकाही ग्राहकाला आपला फ़ोन नंबर आठवत नाही असं व्हायला नको असं मणी यांचं म्हणणं होतं. म्हणूनच तर "जस्ट डायल"चा स्थानिक नंबर २२८८८८८८ आणि राष्ट्रीय नंबर ३९९९९९९९ हा आहे. विसरभोळ्यांच्यासुद्धा सहजच आठवणीत राहू शकणारा.

आज "जस्ट डायल"ची उलाढाल पाचशे कोटींच्यावर गेली आहे. दर वर्षीची मिळकत शंभर कोटींच्या पुढे आहे. भारतातल्या २४० शहरांत ही सेवा उपलब्ध आहे. इथे दररोज वीस लाखाहून अधिक फ़ोनकॊल्सना उत्तरं दिली जातात. याखेरीज "जस्ट डायल"च्या वेबसाइटमधून, मोबाइल-एस एम एस सेवेतून माहिती मिळवणारे लाखो लोक आहेतच. "जस्ट डायल"ने आता उत्तर अमेरिकेत स्थानिक सर्च इंजिन सुरू केलं आहे.

नवतंत्रज्ञानाच्या युगात "जस्ट डायल"सारखी सेवा निर्माण होणं अपरिहार्यच होतं. ग्राहकांना हवी ती माहिती वेगाने आणि विनासायास उपलब्ध होणं हे तर इथे घडतं आहेच. अशा सेवांमुळे टेलिफ़ोनची छापील डिरेक्टरी इतिहासजमा झाली आहे. आपल्याला हवा असलेला पत्ता, फ़ोन नंबर आपल्या मोबाइलमध्येच येऊन पोचला की लगेच फ़ोन लावणं, ती माहिती साठवून ठेवणं हे सगळं आपोआपच होतं. ग्राहक म्हणून आपल्याला सुखावणारं आणखी एक या "जस्ट डायल"मध्ये घडतं. आपण "जस्ट डायल"ला जेव्हा दुसर्‍यांदा फ़ोन करतो तेव्हा तिथली फ़ोन घेणारी व्यक्ती चक्क आपलं नाव घेऊन बोलायला सुरुवात करते. म्हणजे आपण त्यांना जेव्हा पहिल्यांदा फ़ोन केलेला असतो तेव्हा तिथे आपलं नाव, आपला फ़ोन नंबर, इ मेल आय डी अशी सगळी माहिती नोंदवली गेलेली असते. आणि पुढच्या प्रत्येक खेपेला ती वापरली जाते. ग्राहकाचा रुबाब यामुळे वाढतो.

"जस्ट डायल"मध्ये आणखीही काही आहे. इथे नोंदवल्या जाणार्‍या माहितीचा अभ्यास केल्यावर जाणवतं की नव्याने व्यवसाय सुरू करणार्‍यांची गर्दी जास्त आहे. उद्योगिनी स्त्रियांची तिथली वाढती नोंदणी हे उद्योग-धंद्याच्या क्षेत्रात स्त्रियांची दमदार वाटचाल सुरू असल्याचं लक्षण आहे. पाळणाघर, ब्युटी पार्लर चालवणार्‍या, शिकवण्या घेणार्‍या, घरगुती वस्तूंची विक्री करणार्‍या स्त्रियांना अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्यासाठी, आपला व्यवसाय वाढवण्यासाठी "जस्ट डायल"सारखी सेवा मदतकारक ठेरली आहे. तिथे नाव नोंदवणारे सांगतात की व्यवसाय सुरू केल्यानंतर सुरुवातीच्या काळात या सेवेचा खूपच उपयोग होतो. तंत्रज्ञान सामान्य माणसाचं बळ कसं वाढवतं त्याचं "जस्ट डायल" हे उदाहरण आहे.

दिवाळीलाइक अशी सुरू झाली- एक कूsssल स्टोरी

१० ऒक्टो.

सन २०२० मध्ये जगातल्या तिसर्‍या पिढितल्या अमेरिकास्थित ग्लोबल मराठी(?) मुला-मुलींच्या इंग्राठी भाषेत ही कथा अशी सांगितली जाईल का?

एक कूssssल किंग होता....राजा... यु नो? तो एकदम.. लाइक पॊप्युलर होता. पीपलचा आवडता राजा. त्याचं नाव राम....यु नो? कूssल गाय...ओल्ड फ़ॆशन बट कूssल नेम... यु नो?...याsss सेssम...लाइक गॊडचं नाव... राssम. त्याला एक स्टेपमॊम होती. यु नो?...त्याच्या डॆडची सेकंड की थर्ड वाइफ़. नो किडिंग. यु नो? ओल्ड फ़ॆशन मॆरेजिस्. तिने तिच्या हजबंडला... यु नो ...रामच्या डॆडला फ़ोर्स केलं की रामला जंगलात पाठवा. यु नो?...सम ओल्ड फ़ॆशन वर्ड ...अ..भ...या...रण्य...? आउटडेटेड मराठी लिंगो यु नो? नॆशनल फ़ॊरेस्टलाइक. पुअर कूssल गाय... तो राम जंगलात गेला. त्याला त्याच्या वाइफ़ने आणि ब्रदरने कंपनी दिली...आफ़्टरऒल तो खूssप दिवस जंगलात राहणार होता. मग तो बोअर झाला असता ना म्हणून! मग दीज थ्री पीपल डिसायडेड टु चिल आउट टुगेदर इन जंगल. कूssल आयडिया ना?

पण शीट्‍ ! जंगल सॊ्ल्लि्ड्ड हॊरिबल होतं. मोठे मोठे डेव्हिल्स...यु नो राक्षसाज्..होते तिकडे. आणि मंकीजपण. पण राम वॊज रीssअल ब्रेssव्ह यु नो? त्याने त्याच्या "बो"ने आणि "ऎरो"ने सगळ्यांना पळवून लावलं...कूsssल ना? ओल्ड फ़ॆशन वॊर ..यु नो?

पण फ़ॊरेस्टमध्ये ना; देअर वेअर गॆंगस्टर बॊइज....सम रावणलाइक... यु नो? धिस गॆंगस्टर गाय रावण वॊज सो कृएल यु नो? ही पिक्ड अप बेब सीता...लाइक हिज वाइफ़...हिज मिन्स रामची वाइफ़. नो किडिंग..! आय नो स्टोरी इज लिट्‍ल कन्फ़्युजिंग...लाइक यु नो?

बट अवर कूssल बॊय राम आणि त्याचा तो ब्रदर लक्ष्मणलाइक...दे वेअर सोsss मच ब्रेssव्ह यु नो? लक्ष्मण...लाइक ओल्ड फ़ॆशन नेम यु नो? यु कॆन कॊल हिम "लक्स" ओके? मग ते रावणाबरोबर वॊर खेळले. रावण....यु अंडरस्टॆंड? डोन्ट कॊल हिम बाय एनी अदर नेम. पुढच्या स्टोरीत रावण नाहीच. एनिवेज्...वोरमध्ये राम, लक्स, हनी यांच्या हेल्पला खूप सारे गॊड्सपण आले. मंकीजची आर्मीपण होती. कूsssल आयडिया ना? मंकीजना ट्रेनिंग दिलेलं. कोणी? नो मोअर क्वेश्चन्स प्लीज. गॊड्स काय पणलाइक करू शकतात; यु नो? स्टोरी सांगू की नको? हां....सो... नो किडिंग. एक हनुमान नावाचा जायंट मंकी पण होता. नॊट हनिमुन. नो जोक्स प्लीज. ह...नु...मा..न. ओकीज्....यु कॆन कॊल हिम "हनी"....यु नो...ओबामाज् गॊड. ही कम्स राइट फ़्रॊम जंगल टु यु एस.

एनिवेsज् दीज गायीज् राम, लक्ष्मण, हनुमान यांनी वॊर केलं. ते जिंकले. सीता...यु कॆन कॊल हर स्वीटी ओके? सो शी केम बॆक टु जंगल. कूssल ना?

त्यांचा जंगलात टाइम अपलाइक झालेला. ते खूप बोअर झालेले. जंगलात टीव्ही नाही, नेट कनेक्शन नाही, मोबाइलची रेंज नाही, मॊल्स नाहीत...शीट्‍ ! बोअरिंग. मग दे डिसायडेड टु राइड बॆक होम. आता खूप ईयर्सनंतर बॆक होम. तर सेलिब्रेशनलाइक पाहिजे ना! यु नो त्या काळी बार, क्लब नव्हते. सो कान्ट टेक आउट देम टु ड्रिंक ना! पण कायतरी सेलिब्रेट तर करायलाच पाहिजे. आपले ग्रॆंडपा यु एस ला आले की आपण करतो. आपण इंडियात गेलो की ते करतात. दीज् गायीज् राम, स्वीटी, लक्स.. फ़ॊरेस्टमधून आलेले ना! कूsssल.

मग त्यांनी स्वीट्स बनवले. त्यांच्याकडे खूप लॆम्प्स होते. ते त्यांनी लावले. प्रेटी कूल ना? त्यांनी फ़ायरवर्क्सलाइक केलं. ऒर्केस्ट्रा वाजवला. डान्सपण केला. कूsssल. चार जुलैला यु एस डे ला करतात...लाइक दॆट. पण यु नो? ओल्ड स्टाइल...मोअर कलर्स आणि स्टफ़...सोsss कूsssल. तर तेव्हापासून हे दिवाळी फ़ेस्टिवललाइक सुरू झालं. रिअल्लीsss...माझ्या डॆडच्या डॆडच्या डॆडनी सांगितली ही स्टोरी. नो किडिंग...

जुने जाउद्या...

१९ सप्टेंबर ०९ -

जुने जाउद्या...

काळ जसजसा बदलत जातो तसतसं व्यक्ती म्हणून, समाज म्हणून आपणही बदलत जातो असं दिसतं. म्हणजे नेमकं काय होतं? आपले अगोदरचे विचार, आपल्या भूमिका नव्याने तपासून, जोखून घ्यायची वेळ आपल्यावर येते. आपल्यावर बदलायची "वेळ येतेअसं म्हटलं कारण अनेकदा असं होतं की आपल्याला स्वत:हून बदलायचं नसतं, सोन्यासारखं वाटणारं जुनं सोडायचं नसतं. पण भोवतालची परिस्थितीच इतकी बदलते की आपल्याला मनाविरुद्ध का असेना बदलणं भागच पडतं. अर्थकारण आणि तंत्रज्ञान हे दोन प्रभावशाली घटक असे बदल घडवून आणत असतात. कर्ज घेणं हे एके काळी पाप समजलं जायचं. आता क्रेडिट कार्डशिवाय व्यवहार होत नाहीत. घराबाहेरच्या जगातलं मुला-मुलींचं मिसळणं हे ही त्यांच्या पालकांनी दृष्टीआड सृष्टी म्हणून स्वीकारलं आहे. एके काळी संगणकाच्या वापराला विरोध करणार्‍यांनी या तंत्रज्ञानाला आपलसं केलच ना? माणसाची वृत्ती मुळात बदलाला विरोध करण्याची असते. पण मग व्यावहारिक शहाणपण किंवा परिस्थितीचा रेटा यामुळे ती मूळची वृत्ती बाजुला ठेवून माणसं बदल स्वीकारू लागतात. अर्थात रेटा येऊनही जुन्या भूमिका प्राणपणाने जपल्या जातात अशीही उदाहरणं आहेत; खास करून जात, धर्म, वंश, रंग यांच्या अस्मितांच्या संदर्भात. तरीही माणसाला, समाजाला बदलावं लागतंच, सोयीसाठी बाहेर तसं दाखवावं तरी लागतंच.

व्यक्ती बदलतात किंवा व्यक्तींना बदलावं लागतं तसंच संस्थांचंही होतं. कोण्या एके काळी जी उद्दिष्ट घेऊन संस्था सुरू केल्या जातात, संस्थांमार्फ़त जी कामं सुरू केली जातात ती कालांतराने कालसुसंगत राहिली नाहीत असं होतं. हे ध्यानात आलं की उद्दिष्ट तपासून कामाची पुनर्र्चना करण्याचे प्रयत्न सुरू केले जातात. हे सगळं सोपं नसतं. मुळात बदललेल्या जगाचं आकलन नेमकेपणाने होणं महत्वाचं असतं. एका विशिष्ट रीतीने विचार आणि काम करायची सवय झालेली असते. ही सवयही बदलावी लागतेच. कामाची, संवाद-संपर्काची साधनं नवनवी साधनं, माध्यमं येत जातात. भाषा, शैली हे ही जुनं होत जातं. लोकांना, नव्या पिढीला आकर्षून घेणारा कार्यक्रम लागतो....वगैरे वगैरे.

ग्रंथाली या संस्थेचं उदाहरण घेऊनच हे सगळं समजून घेऊया. आत्ता पन्नाशीच्या अलिकडे-पलिकडे असलेल्या वाचन, सामाजिक चळवळींकडे ओढा असलेल्या मुंबई-पुण्यातल्या माझ्यासारख्या अनेकांचं ग्रंथालीशी भावनिक, वैचारिक नातं आहे. ग्रंथाली ही रूढार्थाने संस्था नव्हतीच. वाचक चळवळ याच नावाने ती सर्वपरिचित होती. आताच्या भाषेत बोलायचं तर ते एक नेटवर्क होतं. पुस्तकप्रेमी, समाजस्नेही, कृतीवादी तरुणांचं नेटवर्क. महाराष्ट्रातल्या सर्व चळवळींचं ग्रंथाली हे ऒर्कुट होतं. नव्याचं स्वागत आणि कौतुक करणारी, मुख्य प्रवाहाच्या बाहेरच्या धारांना मानाचं स्थान देणारी ही चळवळ सुरू झाल्यापासून पंधराएक वर्ष जोमात होती. काळाशी सांधा जोडून होती. पुढे काय झालं?

ग्रंथालीची चाकं नव्या काळाच्या रस्त्यावरून चालवण्याच्या प्रयत्नात असलेले संस्थेचे तरुण विश्वस्त धनंजय गांगल यांच्याशी संस्थेच्या नवं-जुनं असण्याची चर्चा केली. १९९२-९३ पासून धनंजय ग्रंथालीसोबत काम करत आहेत. आय आय टीतून इंजिनिअर झालेले आणि कॊम्प्युटर सॊफ़्ट्वेअरचा व्यवसाय करणारे धनंजय बदलणार्‍या जगाचा संदर्भ जराही सुटू न देता विचार करतात. ते म्हणतात - "पूर्वी आतासारखी माध्यमांची गर्दी नव्हती. महाराष्ट्रात जे नवं घडत होतं त्याला एक प्लॆटफ़ॊर्म हवा होता. तो ग्रंथालीने उपलब्ध करून दिला. ग्रंथाली मुळात युवकांच्या, स्त्रियांच्या, दलितांच्या चळवळींनीच घडवली, आकाराला आणली. पुस्तकं छापणं हे ग्रंथालीचं मुख्य काम कधीच नव्हतं. ग्रंथालीसाठी पुस्तकं हे लोकांपर्यंत पोचण्याचं एक साधन होतं. चळवळ आणि प्रकाशन व्यवसाय याचं हे एक कॊम्बिनेशन होतं. आणि तेच ग्रंथालीचं बळ होतं. पण हे मॊडेल आर्थिक दृष्ट्या यशस्वी होऊ शकलं नाही. आणि भांडवल मिळवण्यासाठी ग्रंथाली पुस्तक छापत राहिली."

कोणतंही काम टिकून राहण्यासाठी आणि ते वाढण्यासाठी ते एक बिझिनेस मॊडेल म्हणून यशस्वी होण्याची गरज असते. कामाला पैसा लागतो आणि माणसं लागतात. स्वयंस्फ़ूर्तीने काम करणारी माणसं पैशाची कसरसुद्धा भरून काढू शकतात. जागतिकीकरणामुळे सुरू झालेल्या बदलांचा एक अटळ परिणाम चळवळीकडे स्वतःहून येणारा माणसांचा ओघ आटण्यात झाला. नोकर्‍या, उद्योग-धंदे या क्षेत्रात बदल होत होते, मध्यमवर्गाला सुखासीनतेची ओढ लागली होती, आर्थिक क्षेत्रात खाजगीकरण वरचढ होत चाललं होतं, बाजाराची सत्ता प्रस्थापित होत होती, चॆनल्सचा जमाना सुरू झाला होता, इंटरनेटने माहितीचं महाद्वार सर्वांसाठी उघडलं होतं. काळ वेगाने बदलत चालला होता. ग्रंथाली कुठे होती?

धनंजय सांगतात - "ग्रंथाली पुस्तकं छापण्यातच रमली होती. जगात होत असलेले बदल समजून घेण्याऎवजी आपण करत आहोत तेच कसं योग्य आहे असाच दॄष्टिकोन होता. एकूणच बदललेल्या जगाला हीन समजलं जायचं, तुच्छ लेखलं जायचं. एक वाचन तेवढं काय ते महान आणि बाकी चॆनल्स वगैरे सगळं घाण असा पवित्रा असायचा. पण याच काळात वॄत्तपत्रांची, मराठी वॄत्तपत्रांची संख्या वाढत चालली होती. महिना तीनशे रुपयात तीन -चार वॄत्तपत्र, तेवढ्याच पैशात शेकडो चॆनल्स मिळू लागली. यातून घरबसल्या माहिती आणि मनोरंजन भरपूर सुरू झालं. लोकांना घराबाहेर पडण्याची गरज वाटेनाशी झाली. नोकरीच्या ठिकाणी कामाच्या वेळा वाढल्याने कार्यकर्त्यांना सामाजिक -सांस्कॄतिक उपक्रमांसाठी वेळ काढणं कठीण होऊ लागलं. दुसरीकडे सामाजिक चळवळी थंड होत गेल्या. आणि याच काळात लोकांपर्यंत, विशेषतः तरुण पिढीपर्यंत पोचणारं माध्यम येऊन थडकलं - इंटरनेट. ग्रंथाली या सगळ्या वातावरणात मागे पडत गेली."

आता ग्रंथालीचं रुचीहे मासिक इमेलवरून पंधरा हजार वाचकांपर्यंत पोचतं. बॄहनमहाराष्ट्र अधिवेशनातून ग्रंथाली महाराष्ट्रा-भारताबाहेरच्या मराठी वाचकांपर्यंत पोचते. जनसंवाद सारख्या कार्यक्रमांमधून नव्या रीतीने चळवळ उभी करण्याचा प्रयत्नही सुरू आहे. ग्रंथाली ज्या संक्रमणातून गेली, जे पेच तिने अनुभवले त्याच परिस्थितीतून सगळ्याच सामाजिक - सांस्कॄतिक संस्थांना जावं लागलं आहे. आजच्या काळात जुन्या पद्धतीने संस्था चालवून भागणार नाही. आपापल्या सुरक्षित घरट्यांमधून बाहेर पडावंच लागेल. खुल्या मनाने नव्याला सामोरं जावंच लागेल. ग्रंथाली थंडावल्याचं वैषम्य अशासाठी की ती त्या जुन्या काळातही नव्या पद्धतीने, खुल्या विचारानेच काम करत होती. अगदी १९९०-९२ मध्येही ग्रामीण-शहरी मराठी नवसाक्षर वाचकांसाठी कोणत्या प्रकारची साहित्यनिर्मिती व्हावी याचा शोध घेण्याचा प्रयत्न ग्रंथालीने केला होता. हे नक्कीच नवं होतं. तरीही कालसुसंगत राहण्यात ती मागे पडत गेली. नवं तंत्रज्ञान वापरता आलं नाही हे त्याचं कारण नक्कीच नाही. नव्या तंत्रज्ञा्नातूनही लोकांना नेमकं काय द्यायचं, त्याहीआधी लोकांना नेमकं काय हवं आहे हे समजण्यातली कमतरता हेच मागे पडण्याचं कारण असणार. हा सगळा पेच, गुंता सोपा नाहीच. तो सोडवणं कोणा एका-दोघांच्या हातातही नाहीच. धनंजय किंवा आणखी तरुण मंडळींना याचं नीट आकलन होऊ शकतं. आणि त्यांच्या प्रयत्नांमधूनच आजच्या काळातलं ग्रंथालीचं ऒर्कुट शोधायला मदत होऊ शकते.

- मेधा कुळकर्णी

जुने जाउद्या...

१९ सप्टेंबर ०९ -

जुने जाउद्या...

काळ जसजसा बदलत जातो तसतसं व्यक्ती म्हणून, समाज म्हणून आपणही बदलत जातो असं दिसतं. म्हणजे नेमकं काय होतं? आपले अगोदरचे विचार, आपल्या भूमिका नव्याने तपासून, जोखून घ्यायची वेळ आपल्यावर येते. आपल्यावर बदलायची "वेळ येतेअसं म्हटलं कारण अनेकदा असं होतं की आपल्याला स्वत:हून बदलायचं नसतं, सोन्यासारखं वाटणारं जुनं सोडायचं नसतं. पण भोवतालची परिस्थितीच इतकी बदलते की आपल्याला मनाविरुद्ध का असेना बदलणं भागच पडतं. अर्थकारण आणि तंत्रज्ञान हे दोन प्रभावशाली घटक असे बदल घडवून आणत असतात. कर्ज घेणं हे एके काळी पाप समजलं जायचं. आता क्रेडिट कार्डशिवाय व्यवहार होत नाहीत. घराबाहेरच्या जगातलं मुला-मुलींचं मिसळणं हे ही त्यांच्या पालकांनी दृष्टीआड सृष्टी म्हणून स्वीकारलं आहे. एके काळी संगणकाच्या वापराला विरोध करणार्‍यांनी या तंत्रज्ञानाला आपलसं केलच ना? माणसाची वृत्ती मुळात बदलाला विरोध करण्याची असते. पण मग व्यावहारिक शहाणपण किंवा परिस्थितीचा रेटा यामुळे ती मूळची वृत्ती बाजुला ठेवून माणसं बदल स्वीकारू लागतात. अर्थात रेटा येऊनही जुन्या भूमिका प्राणपणाने जपल्या जातात अशीही उदाहरणं आहेत; खास करून जात, धर्म, वंश, रंग यांच्या अस्मितांच्या संदर्भात. तरीही माणसाला, समाजाला बदलावं लागतंच, सोयीसाठी बाहेर तसं दाखवावं तरी लागतंच.

व्यक्ती बदलतात किंवा व्यक्तींना बदलावं लागतं तसंच संस्थांचंही होतं. कोण्या एके काळी जी उद्दिष्ट घेऊन संस्था सुरू केल्या जातात, संस्थांमार्फ़त जी कामं सुरू केली जातात ती कालांतराने कालसुसंगत राहिली नाहीत असं होतं. हे ध्यानात आलं की उद्दिष्ट तपासून कामाची पुनर्र्चना करण्याचे प्रयत्न सुरू केले जातात. हे सगळं सोपं नसतं. मुळात बदललेल्या जगाचं आकलन नेमकेपणाने होणं महत्वाचं असतं. एका विशिष्ट रीतीने विचार आणि काम करायची सवय झालेली असते. ही सवयही बदलावी लागतेच. कामाची, संवाद-संपर्काची साधनं नवनवी साधनं, माध्यमं येत जातात. भाषा, शैली हे ही जुनं होत जातं. लोकांना, नव्या पिढीला आकर्षून घेणारा कार्यक्रम लागतो....वगैरे वगैरे.

ग्रंथाली या संस्थेचं उदाहरण घेऊनच हे सगळं समजून घेऊया. आत्ता पन्नाशीच्या अलिकडे-पलिकडे असलेल्या वाचन, सामाजिक चळवळींकडे ओढा असलेल्या मुंबई-पुण्यातल्या माझ्यासारख्या अनेकांचं ग्रंथालीशी भावनिक, वैचारिक नातं आहे. ग्रंथाली ही रूढार्थाने संस्था नव्हतीच. वाचक चळवळ याच नावाने ती सर्वपरिचित होती. आताच्या भाषेत बोलायचं तर ते एक नेटवर्क होतं. पुस्तकप्रेमी, समाजस्नेही, कृतीवादी तरुणांचं नेटवर्क. महाराष्ट्रातल्या सर्व चळवळींचं ग्रंथाली हे ऒर्कुट होतं. नव्याचं स्वागत आणि कौतुक करणारी, मुख्य प्रवाहाच्या बाहेरच्या धारांना मानाचं स्थान देणारी ही चळवळ सुरू झाल्यापासून पंधराएक वर्ष जोमात होती. काळाशी सांधा जोडून होती. पुढे काय झालं?

ग्रंथालीची चाकं नव्या काळाच्या रस्त्यावरून चालवण्याच्या प्रयत्नात असलेले संस्थेचे तरुण विश्वस्त धनंजय गांगल यांच्याशी संस्थेच्या नवं-जुनं असण्याची चर्चा केली. १९९२-९३ पासून धनंजय ग्रंथालीसोबत काम करत आहेत. आय आय टीतून इंजिनिअर झालेले आणि कॊम्प्युटर सॊफ़्ट्वेअरचा व्यवसाय करणारे धनंजय बदलणार्‍या जगाचा संदर्भ जराही सुटू न देता विचार करतात. ते म्हणतात - "पूर्वी आतासारखी माध्यमांची गर्दी नव्हती. महाराष्ट्रात जे नवं घडत होतं त्याला एक प्लॆटफ़ॊर्म हवा होता. तो ग्रंथालीने उपलब्ध करून दिला. ग्रंथाली मुळात युवकांच्या, स्त्रियांच्या, दलितांच्या चळवळींनीच घडवली, आकाराला आणली. पुस्तकं छापणं हे ग्रंथालीचं मुख्य काम कधीच नव्हतं. ग्रंथालीसाठी पुस्तकं हे लोकांपर्यंत पोचण्याचं एक साधन होतं. चळवळ आणि प्रकाशन व्यवसाय याचं हे एक कॊम्बिनेशन होतं. आणि तेच ग्रंथालीचं बळ होतं. पण हे मॊडेल आर्थिक दृष्ट्या यशस्वी होऊ शकलं नाही. आणि भांडवल मिळवण्यासाठी ग्रंथाली पुस्तक छापत राहिली."

कोणतंही काम टिकून राहण्यासाठी आणि ते वाढण्यासाठी ते एक बिझिनेस मॊडेल म्हणून यशस्वी होण्याची गरज असते. कामाला पैसा लागतो आणि माणसं लागतात. स्वयंस्फ़ूर्तीने काम करणारी माणसं पैशाची कसरसुद्धा भरून काढू शकतात. जागतिकीकरणामुळे सुरू झालेल्या बदलांचा एक अटळ परिणाम चळवळीकडे स्वतःहून येणारा माणसांचा ओघ आटण्यात झाला. नोकर्‍या, उद्योग-धंदे या क्षेत्रात बदल होत होते, मध्यमवर्गाला सुखासीनतेची ओढ लागली होती, आर्थिक क्षेत्रात खाजगीकरण वरचढ होत चाललं होतं, बाजाराची सत्ता प्रस्थापित होत होती, चॆनल्सचा जमाना सुरू झाला होता, इंटरनेटने माहितीचं महाद्वार सर्वांसाठी उघडलं होतं. काळ वेगाने बदलत चालला होता. ग्रंथाली कुठे होती?

धनंजय सांगतात - "ग्रंथाली पुस्तकं छापण्यातच रमली होती. जगात होत असलेले बदल समजून घेण्याऎवजी आपण करत आहोत तेच कसं योग्य आहे असाच दॄष्टिकोन होता. एकूणच बदललेल्या जगाला हीन समजलं जायचं, तुच्छ लेखलं जायचं. एक वाचन तेवढं काय ते महान आणि बाकी चॆनल्स वगैरे सगळं घाण असा पवित्रा असायचा. पण याच काळात वॄत्तपत्रांची, मराठी वॄत्तपत्रांची संख्या वाढत चालली होती. महिना तीनशे रुपयात तीन -चार वॄत्तपत्र, तेवढ्याच पैशात शेकडो चॆनल्स मिळू लागली. यातून घरबसल्या माहिती आणि मनोरंजन भरपूर सुरू झालं. लोकांना घराबाहेर पडण्याची गरज वाटेनाशी झाली. नोकरीच्या ठिकाणी कामाच्या वेळा वाढल्याने कार्यकर्त्यांना सामाजिक -सांस्कॄतिक उपक्रमांसाठी वेळ काढणं कठीण होऊ लागलं. दुसरीकडे सामाजिक चळवळी थंड होत गेल्या. आणि याच काळात लोकांपर्यंत, विशेषतः तरुण पिढीपर्यंत पोचणारं माध्यम येऊन थडकलं - इंटरनेट. ग्रंथाली या सगळ्या वातावरणात मागे पडत गेली."

आता ग्रंथालीचं रुचीहे मासिक इमेलवरून पंधरा हजार वाचकांपर्यंत पोचतं. बॄहनमहाराष्ट्र अधिवेशनातून ग्रंथाली महाराष्ट्रा-भारताबाहेरच्या मराठी वाचकांपर्यंत पोचते. जनसंवाद सारख्या कार्यक्रमांमधून नव्या रीतीने चळवळ उभी करण्याचा प्रयत्नही सुरू आहे. ग्रंथाली ज्या संक्रमणातून गेली, जे पेच तिने अनुभवले त्याच परिस्थितीतून सगळ्याच सामाजिक - सांस्कॄतिक संस्थांना जावं लागलं आहे. आजच्या काळात जुन्या पद्धतीने संस्था चालवून भागणार नाही. आपापल्या सुरक्षित घरट्यांमधून बाहेर पडावंच लागेल. खुल्या मनाने नव्याला सामोरं जावंच लागेल. ग्रंथाली थंडावल्याचं वैषम्य अशासाठी की ती त्या जुन्या काळातही नव्या पद्धतीने, खुल्या विचारानेच काम करत होती. अगदी १९९०-९२ मध्येही ग्रामीण-शहरी मराठी नवसाक्षर वाचकांसाठी कोणत्या प्रकारची साहित्यनिर्मिती व्हावी याचा शोध घेण्याचा प्रयत्न ग्रंथालीने केला होता. हे नक्कीच नवं होतं. तरीही कालसुसंगत राहण्यात ती मागे पडत गेली. नवं तंत्रज्ञान वापरता आलं नाही हे त्याचं कारण नक्कीच नाही. नव्या तंत्रज्ञा्नातूनही लोकांना नेमकं काय द्यायचं, त्याहीआधी लोकांना नेमकं काय हवं आहे हे समजण्यातली कमतरता हेच मागे पडण्याचं कारण असणार. हा सगळा पेच, गुंता सोपा नाहीच. तो सोडवणं कोणा एका-दोघांच्या हातातही नाहीच. धनंजय किंवा आणखी तरुण मंडळींना याचं नीट आकलन होऊ शकतं. आणि त्यांच्या प्रयत्नांमधूनच आजच्या काळातलं ग्रंथालीचं ऒर्कुट शोधायला मदत होऊ शकते.

- मेधा कुळकर्णी

नैरोबी मुक्कामी चर्चा शहरी आरोग्याची



झपाट्याने होत असलेलं शहरीकरण नीट हाताळता येणं हे आपल्यापुढचं सर्वात मोठं आव्हान आहे. त्यातही शहराकडे स्थलांतरित होणार्‍या गरीब जनतेच्या आरोग्याचे, खास करून माता-बाल आरोग्याचे प्रश्न. आपल्या देशातही शहरांमध्ये लॆटिन अमेरिका आणि आफ़्रिकेइतक्या समस्याग्रस्त वस्त्या आहेतच. महाराष्ट्राचीही परिस्थिती चिंताजनकच आहे. नैरोबी इथे नुकत्याच झालेल्या आठव्या आंतरराष्ट्रीय नागरी आरोग्य परिषदेत पोटासाठी शहरांत स्थलांतरित होणार्‍या लोकांचे प्रश्न जगासमोर आणण्याचा प्रयत्न झाला त्याविषयी -

नैरोबी मुक्कामी चर्चा शहरी आरोग्याची

आठव्या आंतरराष्ट्रीय नागरी आरोग्य परिषदेसाठी मी नैरोबीला जायला निघाले तेव्हा माझा मेलबॊक्स "कारिबु केनया" या संदेशाने भरून गेला होता. "कारिबु" म्हणजे केनयाच्या स्वाहिली भाषेत "स्वागत असो". "पाथ" या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या शिष्टमंडळात माझ्यासोबत आणखी सहाजण होते. पाथचं महाराष्ट्रातल्या सात शहरांमध्ये माता आणि नवजात शिशु आरोग्य या विषयावर काम सुरू आहे. अशा तर्‍हेचं शहरी भागात सुरू असलेलं आपल्या देशातलं हे पहिलंच काम आहे. या कामातले अनुभव परिषदेत मांडायचे होते. पाथच्या राज्य संचालक डॊ. बेनझिर पाटील यांनी शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं. परिषदेला एकूण ४५ देशांचे सुमारे आठशे प्रतिनिधी उपस्थित होते. केनयाचे शेजारी असलेल्या इथिओपिया, सोमालिया, टांझानिया, युगांडा, रवांडा, सुदान, घाना या देशातल्या प्रतिनिधींची उपस्थिती नजरेत भरत होती. आशिया, युरोप, अमेरिकेतून आलेलेही भरपूर प्रतिनिधी होते. केनयात फ़िरताना ओबामा स्पिरिट जाणवलं. ओबामा यांचं कौतुक करत ते आमच्यातलेच आहेत असं अभिमानाने सांगणारी माणसं भेटली.
परिषद सुरु होण्याच्या आदल्या दिवशी नैरोबीतल्या काही वस्त्यांना भेट देण्याचा कार्यक्रम होता. शहरी गरिबांचे प्रश्न थेट समजून घेण्याचा हा योग्य मार्ग होता. नैरोबी शहर मुंबईसारखंच आंतरराष्ट्रीय. त्यामुळे वस्त्यांमध्ये काय चित्र असणार त्याचा थोडासा अंदाज होताच. तो दिवस होता २० ऒक्टोबर, केनया डे. वातावरण उत्सवी आणि उत्साही. "कोरोगोशो" नावाच्या एका मोठ्या वस्तीत आम्ही स्थानिक कार्यकर्त्यांसोबत गेलो. लांब-लांब बोळ, दुतर्फ़ा कच्ची-पक्की घरं, कच्चे धूळभरले रस्ते, ठिकठिकाणी कचर्‍याचे ढीग, मातीत खेळणारी मुलं, पाणी भरणार्‍या बाया, नळाला पाणी आल्यामुळे त्यांची पाणी भरण्याची घाई चाललेली, दारूने झिंगलेले पुरुष वगैरे. आपल्या मालेगावातल्या वस्त्यांत शिरल्यासारखंच वाटलं. आणखीही काही होतं. झटून काम करणारे कार्यकर्ते, वस्ती विकासासाठी काम करणार्‍या संस्था, वस्तीचा कम्युनिटी रेडिओ, सरकारचे, नगरपालिकेचे शहर विकासाचे प्रकल्प. सोबतचे कार्यकर्ते सांगत होते - नैरोबी शहरात चार मोठ्या झोपडपट्ट्या आहेत. तिथे सरकारी योजना आहेत. पण भ्रष्टाचारापायी लोकांपर्यंत त्या धड पोचत नाहीत. खासदार निधीचंही तेच. इथल्या लोकांचे आरोग्याचे प्रश्न फ़ार बिकट आहेत. कुपोषणापायी होणारे बालमृत्यु, गर्भावस्थेत, बाळंतपणात होणारे मातामृत्यु, मलेरिया जोरात. लोकांमध्ये पुरेशी जाण नाही. मच्छरदाण्या दिल्या तरी वापरत नाहीत. आरोग्यकेंद्रात जात नाहीत. ते गेले तर तिथे सुविधा नसतात.....समस्यांची न संपणारी साखळी. आपल्यासारखीच. अरबी समुद्र ओलांडून गेलेले आपण पुन्हा आपल्याच देशात परतलो की काय असं वाटण्याइतका सारखेपणा.
परिषदेच्या उदघाटनप्रसंगी इंटरनॆशनल सोसायटी ऒफ अर्बन हेल्थचे संस्थापक अध्यक्ष डॊ. डेव्हिड व्लाहोव म्हणाले - "एकोणीसावं शतक साम्राज्यांचं होतं; विसावं राष्ट्रांचं तर एकविसावं शतक शहरांचं असणार आहे." परिषदेत सादर झालेले पेपर्स, प्रदर्शित झालेली पोस्टर्स, सभागृहात आणि बाहेरच्या भेटींमध्ये झालेल्या चर्चांमधून शहरीकरणातून उद्‍भवणार्‍या समस्यांचा उग्रपणा लक्षात येत होता. त्याचवेळी या समस्या हाताळण्यासाठी आपली सरकारं, धोरणं, आपल्या व्यवस्था सुसज्ज नाही हेही जाणवत होतं.
परिषदेच्या आयोजनात मुख्य भूमिका होती आफ़्रिकन पॊप्युलेशन ऎंड हेल्थ रिसर्च सेंटर (APHRC) ची. सबसहारन आफ़्रिकन देशातल्या समस्या हाताळायला योग्य धोरणं आखली जावीत यासाठी ही संस्था संशोधन करते. या देशातल्या अभ्यासकांमध्ये संशोधन करण्यासाठी आवश्यक कौशल्य निर्माण व्हावीत आणि त्यांच्या संशोधनाची गुणवत्ता वाढावी यासाठी ही संस्था प्रयत्न करते. डॊ. ऎलेक्स एझ हे संस्थेचे कार्यकारी संचालक आहेत. नायजेरियातल्या छोट्या गावात निरक्षर आईच्या पोटी जन्मलेल्या, गरिबीचा दाहक अनुभव घेतलेल्या ऎलेक्स यांचा प्रवास कौतुकास्पद आहे. या गरिबीनेच त्यांना सामाजिक क्षेत्रात आणलं. लोकसंख्या शास्त्र या विषयात अमेरिकेतल्या विद्यापीठात डॊक्टरेट करून ऎलेक्स आफ़्रिकेत परतले आणि त्यांनी तिथल्या समस्यांचा अभ्यास सुरू केला. आफ़्रिकन पॊप्युलेशन ऎंड हेल्थ रिसर्च सेंटरचे कार्यकारी संचालक म्हणून त्यांना सर्वप्रथम संशोधनावर लक्ष द्यायची गरज वाटली. ऎलेक्स म्हणाले - "अमेरिकेतले अभ्यासक आमच्याकडे येऊन आमच्या प्रश्नांवर संशोधन करत असतात. पण ज्यांचे प्रश्न त्यांनीच अभ्यास करणं, उपाय शोधणं महत्वाचं वाटल्याने मी आफ़्रिकन संशोधकांची संशोधन क्षमता वाढवण्याचे प्रयत्न करायला सुरुवात केली. हे मोठं आव्हान होतं. आमची कौशल्य वाढणं, आमच्याकडे माहिती जमा होणं, ज्ञान निर्माण होणं, आमच्या संशोधकांची पिढी निर्माण करणं निकडीचं होतं. बाहेरच्या संशोधकांवर किती काळ अवलंबून राहायचं? तीन संशोधकांना हाताशी धरून मी सुरुवात केली होती. आता दोनशेहून अधिक आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधक आज आमच्याकडे आहेत. आफ़्रिकेतल्या समस्या शोधणं, त्यांचा अभ्यास, दस्तऎवज तयार करणं, समस्या नेमकेपणाने प्रकाशात आणणं आणि त्या सोडवण्यासाठी ठोस कृती सुचवणं ही APHRC च्या कामाची व्याप्ती आहे. झपाट्याने होत असलेलं शहरीकरण नीट हाताळता येणं हे आपल्यापुढचं सर्वात मोठं आव्हान आहे. त्यातही शहराकडे स्थलांतरित होणार्‍या गरीब जनतेचे माता-बाल आरोग्याचे आणि मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न. APHRC ने आफ़्रिकन देशांमधल्या सरकारांच्या धोरण प्रक्रियेवर प्रभाव टाकायला सुरुवात केली आहे. मुलांच्या पूर्व प्राथमिक शिक्षणाविषयीचं धोरण, गरीब वस्त्यांमध्ये प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबतचे निकष सैल करणं, प्रसुतीत मदत करणार्‍या महिलांना सेल फ़ोन देणं, आरोग्य कार्यकर्त्यांसाठी सुधारित प्रशिक्षण असं काही APHRC च्या प्रयत्नांमुळे घडलं आहे. पण समस्या एवढ्या मोठ्या आहेत की APHRC सारख्या दहा संस्थासुध्दा कमीच पडतील."
"कोरोगोशो" या वस्तीत आमच्यासोबत त्या मतदारसंघाच्या तरुण तडफदार खासदार एलिझाबेथ ओरोंगो आल्या होत्या. केनया सरकारचं नैरोबी महानगरासाठी एक विभाग आहे. एलिझाबेथ या विभागाच्या सहाय्यक मंत्री आहेत. त्यांच्या पक्षाच्या त्या राष्ट्रीय उपाध्यक्षही आहेत. त्यांचं वस्तीतल्या लोकांमध्ये मिसळणं, प्रत्येकाची विचारपूस करणं, हसणं, समूहनृत्यात सहभागी होणं हे आम्हा परदेशी पाहुण्यांना थक्क करायला लावणारं होतं. त्यांच्याभोवती ठिकठिकाणी लोक गोळा होत होते. त्या थांबत छोटेखानी भाषणं करत होत्या. प्रत्येक ठिकाणी ठासून सांगत होत्या - "मी तुमच्यातूनच आले आहे. मला तुमच्या समस्या समजतात. मी तुमच्यासाठी खूप काही करू इच्छिते. तेव्हा सहकार्य करा. धीर धरा. सरकारचा, माझा तुम्ही फ़ायदा करून घ्या." प्रत्येक ठिकाणी त्या योजनांची माहितीही देत होत्या. माता-बाल आरोग्य, मुलांचं शिक्षण, तरुणांसाठी संगणक प्रशिक्षण, रोजगार या विषयावरच्या योजना. आपल्याप्रमाणेच केनया सरकारमधल्याही भ्रष्टाचाराच्या सुरस कहाण्या तिथे ऎकायला मिळाल्या. एलिझाबेथ यांनी त्यांच्या मतदार संघाला मिळालेला निधी भ्रष्टाचाराच्या गंगेत वाहून जाऊ नये आणि खर्चावर लोकांचं लक्ष रहावं म्हणून स्थानिक समित्या नेमल्यात. या समित्यांवर त्या स्वतः लक्ष ठेवतात असं दिसत होतं. खासदारपणा, मंत्रीपणा याची झूल त्या जराही वागवत नव्हत्या. म्हणूनच त्यांना भेटून सरळ विचारावसं वाटलं की भेटीसाठी, मुलाखतीसाठी वेळ द्याल का आणि त्यांनी ताबडतोब ते मान्यही केलं. नैरोबीहून आम्ही निघायच्या आदल्या दिवशी त्यांनी मुलाखतीसाठी वेळ काढला. त्यांच्या कार्यालयात दोनेक तास आमच्या गप्पा खूप रंगल्या. त्या ठामपणे मांडत होत्या - "रिकाम्या पोटी जे कधी झोपले नाहीत, एका शिलिंगची किंमत किती मोठी असते ते ज्यांना कधी कळलं नाही ते गरिबांसाठी योग्य धोरणं आखूच शकणार नाहीत. हा अनुभव मी घेतला आहे. लहानपणी कुटुंबियांवर अन्याय झालेला पाहिला. तरुणपणात अत्याचाराचा बळी मी स्वतः ठरले. तेव्हापासून खूप राग मनात भरून राहिला होता. नव्या व्यवस्था घडवायला पाहिजेत असं वाटू लागलं. आता लोकप्रतिनिधी म्हणून आपण आखलेल्या धोरणांमुळे गरिबांच्या जीवनात फरक पडतो ही समाधानाची गोष्ट आहे. हेच माझं राजकारण आहे. राजकीय नेतृत्वातूनच समाजात बदल घडू शकतो यावर माझी श्रद्धा आहे. बराक ओबामा यांच्या विजयाने केनयामधल्या गरिबांना आणि माझ्यासारख्या समाजात बदल घडवून आणण्यासाठी राजकारणात आलेल्या व्यक्तीला मोठीच प्रेरणा मिळाली आहे. इतर राजकारण्यांसारखे ते ढोंगी नाहीत. शून्यातून सर्वोच्चपदी पोचलेत ते." भारतातल्या स्त्रियांच्या परिस्थितीबद्दल, गर्भलिंग चाचणीच्या गैरवापराबद्दल त्यांनी आम्हाला प्रश्न विचारले. त्यांचं प्रेरणास्थान कोण या प्रश्नावर आपली निरक्षर, समाजसेवी आजी आणि मदर तेरेसा ही दोन नावं त्यांनी घेतली.
आंतरराष्ट्रीय नागरी आरोग्य परिषदेच्या समारोपाच्या वेळी त्यांनी केलेलं भाषण तर काळजाला हात घालणारं आणि राजकीय नेतृत्वाने वंचितविकासाचा विचार कसा केला पाहिजे ते सूचित करणारं होतं. तिथे जमलेल्या आंतरराष्ट्रीय समुदायापुढे त्यांनी स्वत: भोगलेलं बलात्कारासारख्या अत्याचाराचं वास्तव मोकळेपणाने कथन केलं आणि अविकसित देशांमधल्या गरिबांना कोणत्या विपरित परिस्थितीत जगावं लागतं ते स्पष्ट केलं.
एलिझाबेथ ओरोंगो सांगत होत्या - "हे गरिबीचं दुष्टचक्र भेदल्याशिवाय परिवर्तन होणार नाही. माझ्या कुटुंबात मी ते भेदलं. त्यामुळे माझी आजी, आई यांच्यापेक्षा माझं आयुष्य निराळं झालं. स्त्रियांच्या कार्यक्रमात मी जाते तेव्हा आपल्या अन्याय-अत्याचाराचं रडगाणं पुरे करा आणि भविष्याची आखणी करा असं सांगते. माझ्यासारखंच आणखी स्त्रियांना राजकारणात आणण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. सरकारमध्ये स्त्रियांचं पुरेसं प्रतिनिधित्व असलं पाहिजे. किंबहुना राजकारणच वुमेन फ़्रेंडली असावं असे प्रयत्न मी करत आहे. समाजाचा सर्वात मोठा घटक असतो स्त्रिया आणि बालकं. त्यांच्या विकासासाठी केलेले प्रयत्न समाजात नक्कीच बदल घदवून आणतील."
नैरोबीच्या या परिषदेत पोटासाठी शहरांत स्थलांतरित होणार्‍या लोकांचे प्रश्न जगासमोर आणण्याचा प्रयत्न सुरू होता त्याच वेळी आपल्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले होते. आम्ही नैरोबीहून परतलो तोवर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सूत्र हाती घेतल्याचं कळलं. गरीबी, अनारोग्य यांचा सर्वाधिक सामना करणारा आफ़्रिका खंड; त्यातही सबसहारन आफ़्रिकेतले अगोदर उल्लेख केलेले देश. त्याखालोखाल क्रमांक लागतो आशिया खंडाचा आणि लॆटिन अमेरिकेचा. अर्थात खुद्द आपल्या देशातही शहरांमध्ये लॆटिन अमेरिका आणि आफ़्रिकेइतक्या समस्याग्रस्त वस्त्या आहेतच. महाराष्ट्राचीही परिस्थिती चिंताजनकच आहे. महाराष्ट्राचा मानव विकास निर्देशांक लॆटिन अमेरिकेतल्या सर्वाधिक गरीब आणि मागासलेल्या बोल्व्हिया या जगात ११४ व्या क्रमांकावर असलेल्या देशाइतका आहे. तर मुंबईचा मानव विकास निर्देशांक अमेरिकेतल्या जॊर्जिया या जगात १०० व्या क्रमांकावर असलेल्या देशाइतका आहे.
युनोच्या अंदाजानुसार येणार्‍या तीस वर्षात जगात होऊ घातलेली सगळी वाढ छोट्या अथवा मध्यम शहरांमध्ये होणार आहे. शहरीकरणाची आणि त्यासोबत येणार्‍या समस्यांची तीन प्रमुख केंद्र असणार आहेत सबसहारन आफ़्रिका, आशिया आणि लॆटिन अमेरिका. यासाठीच यंदाची परिषद प्रथमच युरोप-अमेरिकेच्या बाहेर घेतली गेली. लॆटिन अमेरिकन देशांमध्ये शहरीकरणाचा वेग भारताहून अधिक असल्याने त्यांना आत्ता भेडसावणारे प्रश्न आपल्याला येत्या पाच-दहा वर्षांत सतावणारच आहेत. आता राज्यात नव्या सरकारने कामाला सुरुवात केली आहे. तेव्हा शहरी आरोग्यासाठी, विशेषतः माता-बाल आरोग्यासाठी सरकारने पावलं उचलावीत अशी अपेक्षा आहे.
- मेधा कुळकर्णी








अमेरिकन भेळ आणि पनीर पिझ्झा

१२ डिसें ०९

अमेरिकन भेळ आणि पनीर पिझ्झा

पंचतारांकित हॉटेलातला हा ग्राहक – वेटर संवाद -

काय घेणार? चहा, कॉफ़ी, मिलो, चॉकलेट की ज्युस?

चहा.

ओके. कोणता चहा? हर्बल, मसाला, ग्रीन, आइस की बुश?

मसाला.

ओके. ब्लॅक की दूध घातलेला?

दूध पावडर की लिक्विड दूध?

लिक्विड दूध.

ओके. गायीचं की म्हशीचं?

गायीचं दूध.

थंड की गरम?

गरम.

ठीक. साखर की मध की शुगर फ़्री?

साखर.

बीट साखर की उसाची साखर?

उसाची.

ओके. व्हाइट की ब्राउन ?

चहाचं राहुदे. मी पाणीच घीईन.

साधं की मिनरल?

मिनरल.

थंड की साधं?

...........! ! !

आता हा रस्त्यावरच्या भेळवाल्याकडचा संवाद –

क्या बनाउ? चाट या भेल?

भेल.

अमेरिकन? की चायनीज?

इंडियन.

कॉर्न? जैन? पनीर?

...........! ! !

तर हॉटेलातल्या वेटरची, भेळवाल्याची प्रश्नमालिका संपतच नाही. पण या प्रश्नमालिकेतून लक्षात येतं की खाद्य आणि पेय पदार्थांचे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. साध्या चहाचे एवढे प्रकार. आणि उत्तरेकडची भेळ एकदम ग्लोबलच होऊन गेली आहे की!

ग्लोबलायजेशन म्हणजे अमेरिकनायजेशन किंवा अमेरिकेचा नवसाम्राज्यवाद असं एक मत आहे.

जेव्हा विविध देशातल्या शहरा-शहरात एकाच पद्धतीचे मॉल्स उभे राहतात, त्या मॉल्समध्ये एकाच प्रकारच्या वस्तू मिळतात आणि त्यापैकी जास्तीत जास्त ब्रॅंड्स अमेरिकन असतात तेव्हा ग्लोबलायजेशनचा चेहरा आणि मेकअप अमेरिकन, कपडे आणि परफ्युम अमेरिकन, खाद्यपदार्थ आणि जिभेची चवसुद्धा अमेरिकनच असते. पण हळुहळु हे बदलायला लागलं.

जागितिकीकरण मोठ्या शहरांकडून छोट्या शहरांकडे सरकू लागलं आणि मूठभरांकडून सर्वसामान्यांपर्यंत जाऊन जसं पोचलं तसं स्थानिकाची मोहर या ग्लोबलायजेशनवर उमटू लागली.

एक गंमतीदार, खाद्यपदार्थाचं उदाहरण द्यायचं तर सध्या जगभर तरुणांचा सर्वाधिक आवडता पिझ्झा कसा बदलत जातो ते बघू. मॅकडोनाल्डमधून प्रथम अमेरिकेत आणि नंतर जगात अवतरलेला हा पदार्थ आता मुळीच अमेरिकन राहिलेला नाही. आपल्याकडचा पनीर पिझ्झा म्हणजे तर पिझ्झ्याचा शंभर टक्के भारतीय (खरं तर पंजाबी; पण पंजाबीलाच भारतीय समजलं जातं, ना?) अवतार. तमीळनाडूत सांबार पिझ्झाही मिळू लागलाय म्हणे. महाराष्ट्र देशी थालीपीठ पिझ्झा मिळायला हरकत नसावी. अमेरिकेत आणि ब्रिटनमध्ये भारतीयांनी चिकन-टिक्का-मसाला पिझ्झा बनवून इंडियन एक्झॉटिक कुझिनमध्ये भर टाकली आहे.

भारतातल्या मॅकडोनाल्डने अमेरिकन पदार्थांचे भारतीय अवतार शोधून काढणं हे ठीकच. पण याहीपुढे जाऊन चक्क न्युयॉर्कमध्ये मॅक-आलु-टिक्की बर्गर मिळणं, केनया सफारीत धिरडं मिळणं किंवा मूळ उत्तरेकडचा भेळ हा पदार्थ दस्तुरखुद्द लखनौमध्ये बंबईकी भेल या नावाने मिळणं म्हणजे ग्लोबलायजेशनचा कहरच; नाहीतर काय?

जेव्हा मॅगीने मसाला नूडल्स बाजारात आणले तेव्हाच नूडल्सचं चिनीपण लयाला गेलं. दाक्षिणात्य दोसा कधीच संकुचित नव्हता. आधीच त्याने भारतात उत्तरेपर्यंत मजल मारली होती. आता तोही ग्लोबल झाला. दोशाने शेजवान दोशात चिनी नूड्ल्सना जागा करून दिली. तो रोस्टेड टोमॅटो दोसा हे विचित्र नाव धारण करायलाही त्याची काही हरकत नाही.

आपल्या सर्वमावेशक धोरणवाल्या पावभाजीने नूडल्सना आपलंसं करून घेतलं आणि ती चायनीज पावभाजी झाली.

भारतीय मोहर आकाशात मिळणार्‍या खाद्यपदार्थांवरही उमटली आहे. परदेशी विमानकंपन्या विमानप्रवासात चक्क जैन फूडही द्यायला लागल्यात. आणि परदेशी विमानतळांवर पोटॅटो बॉल्स नावाने आपले बटाटेवडेही हजर आहेत. ते खाल्ल्यावर पिण्यासाठी मसाला टी तिथेही आहेच.

भारतीय खाद्यपदार्थ स्वयंपाकगृहाचा उंबरठा ओलांडून ग्लोबल मिडियापर्यंत पोचलेत. भारतीय शेफना सेलिब्रेटी स्टेटस मिळालंय. वाढतं पर्यटन आणि स्थलांतर यामुळे स्थानिक खाद्यपदार्थांचं महात्म्य आणि लोकप्रियताही वाढत चालली आहे. हेच ते ग्लोकलायजेशन.

“द वर्ल्ड इज फ्लॅट” या पुस्तकात थॉमस फ्रीडमनने खाद्यपदार्थांच्या या ग्लोकलायजेशनचं मस्त वर्णन केलं आहे – जागतिकीकरणामुळे सपाट झालेल्या जगासारखाच असतो पिझ्झाबेस, सपाट पाव. त्यावर प्रत्येक देशाने, संस्कृतीने आपापल्या चवींचे, रंग-गंधाचे खाद्यपदार्थ चढवावेत. मग तो पिझ्झा परका राहातच नाही; त्या त्या देशाचा, संस्कृतीचाच होऊन जातो.

मेधा कुळकर्णी